Posted by: अभिजीत दाते | जानेवारी 22, 2009

जत्रा..!

अविनाश ओगले यांच्या “जत्रा” या सुंदर गझलेचं हे विडंबन.

 

(“वधूवर मेळावा” नावाच्या जत्रेला)
उपवर वधू वरांच्या करतात येथ जत्रा.
दोनास चार करण्या भरतात येथ जत्रा.

नजरा कुमारिकांच्या ठरतात जीवघेण्या,
वेठीस बिज्वरांना धरतात येथ जत्रा.

झाले ठिकाण जत्रा चेहरे न्याहाळण्याचे.
चिरडून सर्व हृदये सरतात येथ जत्रा.

वरबाप ना दयाळू हुंड्यास का कठोर,
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा.

आता पुढील वर्षी पुन्हा नवीन आशा.
स्वर्गातल्याच गाठी स्मरतात येथ जत्रा ?

–  अभिजीत दाते


Leave a response

Your response:

प्रवर्ग