पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन.
गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली.
गाडी फ़ुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले.
तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले.
कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे.
उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.
पैसे नकोत पण थोडा एकटेपणा वाटला.
मोडुन पडलाय संसार आणखी मोडू नका कणा
म्हटलं, “मग सोडा युपी दिन, “जय महाराष्ट्र” म्हणा..!”
– अभिजीत दाते


khup sahi lihali aahe. 1dum aawadali.
By: Shital on सप्टेंबर 5, 2008
at 2:54 pm
वा छान ! आवडले !
By: SB Dev on नोव्हेंबर 7, 2008
at 5:10 सकाळी
chhan watali…..
Swakalpanela kusumagrajanchya kavitene jo jivantpana aanalas to chhan watala..
By: pandhari on नोव्हेंबर 25, 2008
at 6:05 pm
Kana Hi Kavita Baalkavinchi Ahe Na?
Shanka vatali mhanun vicharal.
By: Trupti on मे 16, 2009
at 8:07 सकाळी